Showing posts with label इस्लाम. Show all posts
Showing posts with label इस्लाम. Show all posts

Monday, June 7, 2010

बुरख्याच्या प्रश्नावर चर्चला कसे नमवले

आपल्या येथे चर्च संचलित इंग्रजी शाळेत हिंदु मुलींचे कुंकू पुसले जाते. बांगड्या फोडल्या जातात. मेंदी लावल्यास हातावर छड्या मारतात. पालक गप्प बसतात, पण केरळमध्ये एका मुस्लिमाने बुरख्याच्या प्रश्नावर बिलीव्हर्स चर्चला कसे नमवले याची ही साद्यंत हकीकत.
ही घटना आहे दक्षिणेकडील केरळ राज्यातील एकीकडे फ्रान्स, नेदरलॅंड ही ख्रिश्चन राष्ट्रे बुरख्यावरच काय, पण स्कार्फवरही बंदी घालण्याचा कायदा करीत असताना, केरळमधील चर्च बुरख्यापुढे झुकले हे आश्चर्यजनकच आहे. यावरून भारतातील चर्च मवाळ आहे असे मात्र समजू नका. चर्चने चालवलेल्या शाळेत हिंदु मुलींनी कपाळावर कुंकू ,हातात बांगड्या घातलेल्या चालत नाहीत. कुंकू पुसले जाते व बांगड्या फोडल्या जातात. मेंदी लावण्याचा धर्मद्रोेह करीत एखादी मुलगी आली, तर मेंदी लगेच पुसता येत नाही. मग त्या मुलीच्या हातावर एवढ्या छड्या मारल्या जातात की, पुढे ती मुलगी स्वत:च्या लग्नातही मेंदी लावून घ्यायला कचरते. हिंदु मुलींच्या बाबतीत एवढे कडक असलेले चर्च एका बुरख्यापुढे एकदम लोळागोळा कसे झाले?
केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील गुरूपुरम या गावात बिलीव्हर्स चर्चची एक इंग्रजी माध्यमांची शाळा आहे. नझीर मुसलीयार या मुस्लिम गृहस्थाची मुलगी शाळेत होती. ती बुरखा घालून शाळेत आल्यावर शाळेने हरकत घेतली व फक्त गणवेशातच शाळेत येण्यास सांगितले. पालक नझीरने शाळेस कळवले वयात आलेल्या मुलींनी चेहरा झाकणे ही धर्माज्ञा आहे. आमच्या धर्मात तुम्ही ढवळाढवळ हस्तक्षेप करू नका. मुख्याध्यापिका मेरी जेसीथा यांनी लगेच त्या मुलीला शाळेतून काढून टाकले. तिच्या दाखल्यावर शाळा सोडण्याचे कारण या स्तंभापुढे बुरख्याचा आग्रह असे लिहिण्यास त्या विसरल्या नाहीत.
मुलीला शाळेतून काढल्याची तक्रार नझीर यांनी सार्वजनिक संस्था उपसंचालक ए.पी.एम.मोहम्मंद हनीश यांच्याकडे केली. जिल्ह्याचे शिक्षण उपसंचालक व महसूल अधिकारी अशा दुहेरी चौकशीचा आदेश हनीश यांनी दिला. दोन्ही चौकशीत नझीर यांच्या तक्रारीत तथ्य(मेरिट) असल्याचे आढळले. चौकशी अहवाल मिळताच हनिश यांनी पत्रकार परिषद घेतली. चौकशीत शाळा व्यवस्थापनाने अपेक्षित सहकार्य केले नाही तसेच शाळेचा बचाव न पटणारा आहे असे वक्तव्य केले. त्यांनी शिक्षण उपसंचालकांना पुन्हा सखोल चौकशी करून कोणती कारवाई करायची ते सुचवण्यास सांगितले. स्थानिक वृत्तपत्रात या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर राज्याचा मानवाधिकार आयोग जागा झाला. त्यांनी आपणहून (स्यू मोटो) शाळेविरूद्ध गुन्हा नोंदवून शिक्षण संचालकांना चौकशी करण्याचा आदेश दिला. हा प्रकार खरा निघाला, तर शाळेकडून वैयक्तिक आणि धार्मिक अधिकाराचे उल्लंघन झाले असे म्हणावे लागेल असे मानवाधिकार आयोगाने शाळेला पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे. महसुल विभागाने केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी पी. वेणुगोपाल यांना सादर झाला. शाळेकडून चूक झाल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी 7 मे रोजी त्यांनी सर्व संबंधितांची बैठक बोलावली.
एवढा गाजावाजा झाल्यावर बिलीव्हर चर्चचे धाबे दणाणले. मुलीला शाळेत पुन्हा प्रवेश देतो, पण तक्रार मागे घ्या असे आर्जव शाळेने नझीर यांच्याकडे केले. नझीर यांनी ते फेटाळले.
7 मे रोजी झालेल्या बैठकीपूर्वी चर्चने मुख्याध्यापिका मेरी जेसीथा यांना निलंबित केले. चर्चवरच कारवाई होऊन देशभर बदनामी होण्यापेक्षा मुख्याध्यापिकेचा बळी देण्यात आला. बैठकीला सिस्टर जेसीथा ऐवजी बिलीव्हर्स चर्चचे राज्य चिटणीस फादर विल्यम्‌स उपस्थित झाले. ते म्हणाले नेमके काय घडले याविषयी चर्चच्या पदाधिकाऱ्यांना कांहीही सांगण्यात आलेले नाही. मुख्याध्यापिकेची कृती चर्चच्या विश्वसनीयतेला धक्का देणारी आहे. त्यांना निलंबित केले आहे. सदर मुलीला शाळेत परत घेण्यास आम्ही तयार आहोत. आता या प्रकरणाचा येथेच शेवट व्हावा.
मुख्याध्यापिका जेसीथा यांच्या निलंबनाने पालक नझीर संतुष्ट नव्हते. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. त्यांना अटक करावी अशी मागणी नझीर यांनी केली. ते पुढे म्हणाले की, माझ्या मुलीला पुन्हा या शाळेत घालायला मी वेडा नाही. तिला किती सुडबुद्धीने वागले जाईल हे मला माहिती आहे. मुलीच्या शाळा प्रवेशाचा आता प्रश्नच नाही. सिस्टर जेसीथाला अटक एवढीच माझी मागणी आहे. तुमच्याकडून हे होणार नसेल, तर तसे मला सांगा. मी फिर्याद दाखल करतो. फादर विल्यम्‌स आणि जिल्हाधिकारी वेणुगोपाल यांनी खूप विनंती करूनही नझीर आपल्या मागणीवर ठाम राहिले.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या मुलीला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कलेक्टर स्वत: प्रयत्न करणार आहेत. नझीर आता सिस्टर जेसीथाविरूद्ध खटला भरो वा न भरो. बिलीव्हर्स चर्चला त्यांनी चांगली अद्दल घडवली आहे.
केरळमधील चर्च बलाढ्य आहे असे असताना एक पालक नमवतो याला राजकीय पार्श्वभूमी आहे. या राज्यात ख्रिश्चन लॉबी व मुस्लिम लॉबी आहे.(हिंदु लॉबी अर्थातच नाही) या लॉबी कधी मार्क्सवाद्यांकडे तर कधी कॉंग्रेसबरोबर असतात. या दोन लॉंबी सत्तांतर घडवतात. ख्रिश्चन लॉबीचा केरळ कॉंग्रेस पक्ष आहे. हा पक्ष मार्क्सवादी आघाडीत होता. पी.जोसेफ बांधकाममंत्री होते. चर्चने केरळ कॉंग्रेसला आदेश दिला की, मार्क्सवाद्यांची साथ सोडा आणि कॅथॉलिक असलेल्या सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेसला पाठिंबा द्या. त्याप्रमाणे कॅथॉलिक केरळ कॉंग्रेसने एल.डी.एफ. ची (डावी आघाडी) साथ सोडून यु.डी.एफ. मध्ये (कॉंग्रेस आघाडी) प्रवेश केला. जोसेफनी मंत्रीपद सोडले. केरळमध्ये मार्क्सवादी सरकार असून, चर्चने मार्क्सवाद्यांविरूद्ध शड्डू ठोकताच मार्क्सवाद्यांनी चर्चला हा दणका दिला. कारण काहीही असेल, पण चर्चने बुरख्याच्या प्रश्नावर एका सामान्य मुस्लिम व्यक्तीपुढे शरणागती पत्करली हे अंतिम सत्य उरतेच. कॉन्व्हेंट शाळेत आपल्या मुली घालणारे मुर्ख हिंदू पालक या घटनेतून काही बोध घेतील का?

उद्या तालिबानी येतील

तालिबान्यांचा नवा अड्डा झालेल्या येमेन या आफ्रिकी देशातील 8 मुस्लिम धर्मगुरू औरंगाबाद, बीड, अंबेजोगाई येथे राहून गेले. पोलिसांना त्याचा पत्ताच नाही. आज धर्मगुरू आले, उद्या तालिबानी येतील. रक्ताचे सडे पडून गेल्यावर असे कसे झाले? याचा आपण फक्त काथ्याकूट करायचा.
देशात एखाद्या ठिकाणी जिहादी हल्ला झत्तला की, लगेच सुरक्षा यंत्रणात त्रुटी कोठे राहिल्या यावर चर्चा सुरू होते. मुळात या देशाला धर्मशाळेचे स्वरूप आले असून सुरक्षा यंत्रणा नावाची चीज आहे की, नाही याबद्दलचे काहीच्या मनात शंका आहे. पण तो प्रश्न वेगळा. प्रत्येक वेळी हल्ला झाल्यानंतर वर्ष सहा महिन्यांनी आरोपी सापडला तर सापडतो. पुण्यातील जर्मन बेकरीच्या स्फोटातील आरोपीला आता पकडले. स्फोटा झाला तेव्हा आणि त्यानंतर पोलीस तपास यंत्रणा अंधारातच चाचपडत होती. सी.सी.टी.व्ही.ची सोय असूनही आरोपी कोण हे कळत नव्हते. न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरमध्ये बॉंब ठेवणारा जिहादी न्यूयॉर्क पोलिसांनी 48 तासात पकडला. आपल्या येथे असे एकदा तरी झाले का? मुंबईतत समुद्रमार्गे पूर्वी आर.डी.एक्स. आले आता माणसेच आली, कशी आली याची वांझोटी चर्चा आपण करायची. सलग 10 दिवस देशात कोठेही स्फोट झाला नाही तर अतिरेकी कंटाळले किंवा त्यांना वेळ झाला नाही असे म्हणावेे. सुरक्षा यंत्रणेला त्याचे श्रेय कोणी देणार नाही.
सुरक्षा यंत्रणेलाही फार दोष देण्यात अर्थ नाही. ते सरकारच्या अधिपत्याखाली आणि सरकारच्या आदेशाने वागत असतात. एखादाच अधिकारी स्वत:च्या बुद्धीीने हिंदू टेररिस्ट असा अस्तित्वात नसलेला प्रकार शोधून काढतो. यातून ज्यांना संरक्षण देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यांच्याच गोळीने त्याची जीवनयात्रा संपते हा भाग वेगळा. नियतीने उगवलेला सूड असते फार तर म्हणूू. मात्र इतर अधिकारी हतबल आहेत. सोलापुरातील एक जुनी घटना सांगतो. भारत-पाक 50 षटकांचा सामना होता. सायंकाळी 5 वाजता पाकने तो सामना जिंकताच नई जिंदगी परिसरात फटाक्याच्या माळा लागल्या. लगेच पोलीस आले, फटाकेल उडाले तेथील काही तरुणांना पकडून चौकीत आणले. त्यांची चौकशी करण्यापूर्वीच त्यावेळचे कॉंग्रेस आमदार चौकीत आले. हे माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना सोडा असे त्यांनी फर्मान सोडले. बिचारी पी.एस.आय राष्ट्रनिष्ठा दाखवली तर काय परिणाम होईल हे त्याने जाणले.पाकच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना चौकीत चहा पाजून सन्मानाने सोडले. सध्या काश्मिर खोऱ्यात काम करणेच अवघड झाले. अतिरेक्याला मारले तरी नोकरीवर गंडांतर येते. शोपियानसारखी नसती बालंट अंगाला लागतात. कोइमतूर बॉंबस्फोटातील आरोपी मदानी याला केरळ व तामिळनाडू सरकारने किती शाही वागणू दिली ते प्रकरण वेगळेच आहे. अशा वेळी तपास यंत्रणा हतबल झाली नाही तरच नवल.
सुरक्षा यंत्रणा ढिली कशी पडते याचे एक ताजे उदाहरण माझ्या वाचनात आले, प्रकार आहे मराठवाड्यातील बीडचा आहे. येमेनमधील 8 सीरियातील आणि न्यूझीलंडमधील प्रत्येकी एक असे 10 मुस्लिम धर्मगुरू एहसान महंमद या भारतीय नागरिकासमवेत दिल्लीहून औरंगाबादला आले. तेथून 25 एप्रिलला बीडला आले. बीडच्या बशीदगंज भागातील मर्कस मशिदीत ते राहू लागले. थोडे दिवस अंबेजोगाई येथेही त्यांचे वास्तव्य होते. तत्पूर्वी ते निजामाबाद जिल्ह्यात मल्लापल्ली येथेही वास्तव्य करून होते. मुळात धर्म प्रसारासाठी परदेशी व्यक्तींना येथे येऊ देणे हे धर्मनिरपेक्ष धोरणात बसतच नाही. परदेशी व्यक्ती कोणत्या शहरात राहणार, किती दिवस राहणार याची नोंद करावी लागते. परिचित किंवा नातेवाईक यांच्याकडे उतरल्यास त्यांनी आपणहून पोलिसांना कळावावे लागते. निर्देशित गावे सोडून इतर ठिकाणी जाता येत नाही. एवढे नियम असताना या 10 जणांच्या वास्तव्याची कल्पना औरंगाबाद, बीड वा औरंगाबाद, बीड वा अंबेजोगाई पोलिसांना कोणीच दिली नाही. दिल्लीहून त्यांना आणणारे एहसान महंमद किंवा मर्कस मशिदीचे मौलाना जाफर मलीक यांनी पोलिसांना कळवयला हवे होते. पण त्यांना त्याची गरज वाटली नाही. पाणी मुरते ते अस आपला देश म्हणजे धर्मशाळा झाली आहे असे म्हणावे लागते ते यासाठी.
20 मे रोजी पोलिसांनी आपणहून कारवाई केली. पोलीस निरीक्षक इलाही-चाऊस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मौलाना मलीक यांना अटक करण्यातआली. रिपोर्ट ऑफ पोलीस ऑर्डरचे कलम 2, परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 परकीय नागरिक नोंदणी कायदा कलम 5 अशा तीन आरोपाखाली त्यांना अटक झाली.
तुम्ही म्हणाल झाले ते झाले पण पोलिसांनी आपणहून कारवाई केली नाही! केली पण कशी? मौलाना मलिक यांना लगेचच काही तासात जामिनावर मुक्त करण्यात आले. या संदर्भात तबलिक जमातीने पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना न कळवण्यात चूक झाली हे कबूल केले. या 10 जणांचे वास्तव्य वैध आहे असे जमातीचे शेख तलह म्हणाले. ही तबलिक जमात म्हणजे मुस्लिमांनी दारू पिऊ नये, जुगार खेळू नये, भांडण करू नये, हजयात्रा करावी असा सदुपदेश करत असते. काम चांगले यात वाद नाहीी. पण ते करताना देशाचे नियम पाळायला नकोत का? बीड आणि अंबेजोगाईच्या मुस्लिमांची भाषा कोणती आणि सीरिया, येमेनची भाषा कोणती. हाच सदुपदेश स्थानिक धर्मगुरू करू शकत नाही का? का असा उपदेश करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे. त्या 10 जणांचा दोष नाही पण कायदा मोडून त्यांना मराठवाड्यात फिरवणाऱ्यांना लगेच मोकळे कसे सोडले?
येथेनचे लोक येथे येण्याला एक वेगळा कंगोरा आहे. तालीबान्यांचा अड्डा प्रथम अफगाणिस्तानात होता. अमेरिकेने तो नेस्तनाबुत केल्यावर हा अड्डा अफ्रिकेत सुरू झाला आहे. त्यात येमेन हा मुस्लिम देश आहे. तालीबान्यांनी आता तेथे बस्तान बसवले आहे. आज आलेले खरोखरचे धर्मगुरू असतीलही. पण उद्या धर्मगुरू म्हणून येणारे तालीबानी नसतील कशावरून? त्यांना अशी स्थानिक पातळीवर पनाह मिळत असेल तर त्यांचे काम सोपेच आहे. आज खरे धर्मगुरू पाठवून सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करायची आणि त्यातील त्रुटी हेरून उद्या हेतु साध्या करायचा असाहीी हा कट असू शकतो. येमेनचे एकदम 8 धर्मगुरू आले म्हणून ही चिंता. खरे तर आपला देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे बाहेरच्या देशातून येथे धर्मप्रसारासाठी कोणीही येण्याचे कारण नाही असे सरकारनेच म्हणायला हवे.
मग इस्कॉनचा कोणी फ्रेंच कृष्णभक्त आला तर त्यालाही अडवा. पण धमर्तप्रसारासाठी येणाऱ्यांची वाट अडवा. अतिरेकी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. अशावेळी जशास तसे उत्तर देऊ अशा पोकळ घोषणा निरुपयोगी आहेत. पूर्वी शिवराज पाटील आणि आता चिंदबरम्‌ नुसत्या घोषणा देतात. सुरक्षा यंत्रणेतील ही छिद्रे बुजवण्याचे त्यांनी मनावर घेतले तर उपयोग. पण तसे हाणार नाही. अफझल गुरुला फाशी द्या म्हणताच ज्यांचा अंगाचा थरकाप होतो. ते सुरक्षा यंत्रणेत अशी छिद्रे मुद्दाम पाडत असतील. काही सांगता येत नाही.

Monday, March 16, 2009

भारतात तालीबानी राजवट आली तर....

तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया। ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही.
गेले काही दिवस हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे. कधी कधी असे वाटते की हिंदुस्थानात अजूनही 80 कोटी हिंदू आहेत. गांधी-नेहरूंच्या काळात ते जसे निराधार, दुर्बल, हताश होते. कोणीही यावे आणि लाथ घालून जावे अशी हिंदूंची अवस्था होती तशी आज नाही. अजूनही काही हिंदूंची सेक्युलॅरिझमची नशा उतरलेली नाही. तरीपण अनेकांची उतरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानात तालीबानी राजवट येणे शक्य नाही. दुसरा विचार असा येतो की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर, हिंदूंचे खच्चीकरण हाच अजेंडा असलेला कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, त्यातही अर्जुनसिंह, अंतुले, अय्यर (मणीशंकर) हे "अ'पवित्र लोक पुन्हा केंद्रीय मंत्री झाले तर तालीबानी राजवट येण्यात अशक्य ते काय ? हिंदू धर्मीयांचे उच्चाटन होत असेल तर तालीबान्यांना आवतण देण्यास अनेकजण उत्सुक आहेत. सेक्युलॅरिझमची नशा चढलेले हे लोक काहीही करतील.खोटे वाटते ? तीन वर्षापूर्वी बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी प्रत्येक जाहीर सभेत लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर ओसामा बिन लादेन याच्या वेशातील बहुरुपी होता. एक केंद्रीयमंत्री मतासाठी लादेनचा वापर करतो. दुसरे उदाहरण सोलापूर शहरातील आहे. लादेन या नावाची जगभर चर्चा होत असताना महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती पहाणीनिमित्त एका उर्दू शाळेत गेले. त्या शाळेतील एका वर्गात डोकावल्यावर "ओसामा बिन लादेन झिंदाबाद' असे फळ्यावर लिहिलेले आढळले. उर्दू शाळेत मुलांच्या मनावर लादेनची कोणती प्रतिमा उर्दू शिक्षक ठसवत होते याचा सहज अंदाज येतो. तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया. ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या (आता तालीबानी राजवट आल्यावर या देशाला आपला कशाला म्हणायचे. जे कालपर्यंत या देशाला आपला म्हणत नव्हते ते आता आपला देश म्हणतील) देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. 21 व्या शतकात प्रवेश करताना अफगाणिस्तानात आणि आत्ता पाकिस्तानच्या स्वात या वायव्येकडील प्रांतात तालिबानी जी जीवनपद्धती राबवित आहेत तीच या देशात राबविली जाऊ लागल्यावर काय चित्र दिसेल ते रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे.तालीबान्यांना चित्रपटाचे एकदम वावडे आहे। चित्रपटात काम करणे इस्लामविरोधी असल्याने शाहरुख, अमीर, सलमान, सैफ अली, अरबाझ, अकबर आणि जे कोणी खान असतील त्या सर्वांना गोळ्या घालून ठार मारले जाईल. पूर्वी काम करत होता म्हणून फिरोजखान, संजयखान हेही सुटणार नाहीत. नाच हा पण इस्लामविरोधी असल्याने सर्व डान्सबार एका फटक्यात बंद होतील. पाकिस्तानमधील एक नर्तिका शबाना ही तालीबान्यांच्या हाती सापडली तर तिला मैदानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डान्सबारला विरोध तर पबचे नावच काढू नका. पब संस्कृतीचे समर्थन करणाऱ्या रेणुका चौधरी, गिरीजा व्यास यांनाही गोळ्या घालून मारले जाईल. खरे तर नौशाद हे माझे आवडते संगीतकार आहेत. त्यांच्याबद्दल असे लिहिताना मला नको वाटते, पण तालीबानी राजवट आल्यावर संगीतकार नौशाद इस्लामविरोधी ठरतील. सनईसम्राट बिस्मिल्लाखान, महान गायक बडे गुलाम अलीखान, तबला सम्राट अल्लारखान हे आता हयात नाहीत. त्यांच्या सी.डी. आहेत. नाचणे, गाणे, वाद्यवादन, चित्रपट हे आक्षेपार्ह असल्याने प्रत्येक गावात अशा सी.डी. गोळा करण्यात येईल. या उप्पर एखाद्याच्या घरी अशी सी.डी. सापडलीच तर तालीबान्याची गोळी त्याच्या छातीतून आरपार गेलीच समजा.
देशात अनेक दर्गे आहेत। त्याच्या उरुसाची सांगता कव्वालीने होत असते. कव्वाली हा प्रकारही इस्लामविरोधी असल्याने कव्वाली आणि कव्वाल इतिहासजमा होईल. मुळात तालीबानी हे वहाबी इस्लामी आहेत. त्यांना फक्त मशीद मान्य आहे. हिंदुस्थानात सध्या जे दर्ग्याचे उदंड पीक आले आहे आणि येत आहे ते तालीबान्यांच्या मते इस्लाम विरोधकांचे षडयंत्र आहे. इस्लामी धर्ममतानुसार अल्लाह हा अमूर्त, निराकार स्वरुपात आहे. दर्गा म्हणजे मूर्तस्वरूप येते. त्यामुळे दर्गा ही कल्पना वहाबी इस्लामला अमान्य आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हे दर्गे कोणा ना कोण्या मर्त्य मानवाच्या नावाने असतात. इस्लामच्या मते सर्वशक्तीमान अल्लाहच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचीही प्रार्थना, पूजा, भक्ती ही इस्लामविरोधी आहे. कोणाला पटो न पटो, तालीबान्यांच्या वहाबी इस्लाममध्ये दर्ग्याला कसलेही स्थान नाही. औरंगजेब कट्टर मुस्लिम होता. मनात आणले असते तर त्याने आपल्या कबरीला मोठ्या दर्ग्याचे स्वरूप दिले असते. पण नाही. संभाजीनगरला जाऊन शहेनशहा औरंगजेबाची कबर पहा. किती लहान व साधी आहे. परवरदिगार श्रेष्ठ मी क्षूद्र अशी औरंगजेबाची धारणा होती. त्यादृष्टीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे हे इस्लामविरोधीच ठरेल. इस्लाममध्ये महिलेची हत्या निषीद्ध आहे. अफझलखानाने तर प्रतापगडावर जाण्यासाठी विजापूर सोडताना आपल्या जनानखान्यातील 69 बायकांना ठार मारले होते. असला अफजलखान पूजनीय होणे आणि धूप जाळू प्रचंड दर्गा बांधणे, तेथे लोकांनी नवस बोलणे हे सर्व इस्लामलाच मंजूर नाही. या पद्धतीने ताजमहालचे काय होईल सांगता येत नाही.
तालीबानी सत्ता आल्यावर शरीयत लागू होणार हे उघड आहे। लक्षात घ्या, बलात्कार अथवा अनैतिक संबंध यासाठी दगडाने ठेचून मृत्यू ही शिक्षा आहे. अफगाणिस्तानात अफूचे भरपूर पीक येते. नशापाणी इस्लामला अमान्य असल्याने काळे सोने समजली जाणारी अफूची सर्व शेते तालीबान्यांनी पैशाचा मोह न ठेवता उद्‌ध्वस्त केली. दारु, चरस, गांजा, अफू, गर्द जवळ बाळगणे, सेवन करणे, विक्री करणे याचा अर्थ फासावर जाणे हा होईल. चोरी केली तर हात तोडणे, दुसऱ्यावर हल्ला करून त्याचा एखादा अवयव निकामी केला तर हल्लेखोराचा तोच अवयव तोडला जाईल. दात पाडला तर दात पाडला जाईल. डोळा फोडला तर हल्लेखोराचा डोळा फोडला जाईल. हे नियम लागू झाल्यावर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यवत होईल यात शंका नाही. मी स्वत: अशा न्यायव्यवस्थेचे स्वागत करेन. याचा फटका सर्वाधिक फटका कोणाला बसेल हे प्रत्येक गावातील पोलीस रेकॉर्डच सांगेल.
आता अशी तालीबानी राजवट आल्यावर मद्यनिर्मितीचे कारखाने बंद पडतील। विजय मल्ल्या एकदम गरीब माणूस होईल. एम.एच.व्ही. आणि त्यानंतरच्या सगळ्या सीडी कंपन्या बंद पडतील. सध्या 300 चॅनल्स आहेत आणि आणखी 200 येऊ घातली आहेत. पण यापुढे पीस टीव्ही आणि क्यू टीव्ही सोडल्यास अन्य चॅनल दिसणार नाही. झी, सोनी, स्टार, इ टीव्ही, सन, जेमिनी विसरून जा. फार तर पवित्र कुराणाचे मराठीत अर्थ विशद करणारे एखादे मराठी चॅनेल सुरू होईल.
फॅशन हा प्रकारच बंद होईल। बुरखा सक्तीचा आणि पुरुषांना कुडता व टाचेच्या वर दोन इंच तुमान हाच पोषाख. टाचेपर्यंत विजार आली म्हणून एका शिक्षकाला 15 दिवसापूर्वी रस्त्यातच गोळी घालून मारण्यात आले. "येथे दाढी केली जाणार नाही' असा फलक प्रत्येक केशकर्तनालयाबाहेर लावावा लागेल. त्यामुळे न्हाव्याचा धंदा निम्मा तरी कमी होईल.
या सर्वांचा एकत्रित विचार केला तर किती क्षेत्रे बंद होऊन किती रोजगार कमी होईल ते कळेल. प्रमोद मुतालिकचे लग्न झाले नाही म्हणून तो असा वागतो असे म्हणणारी रेणुका चौधरी, प्रमोद मुतालिकला रानटी म्हणणारा सोली सोराबजी आणि फळ्यावर "लादेन झिंदाबाद' असे लिहिणारा उर्दू शिक्षक शिक्षक या सर्वांना या परिणामांचा विचार करावा.